Sunday, August 23, 2020

 ।। श्री सद्गुरु समर्थ ।।

श्रावण मास साधना सप्ताह – दि.27.07.2020, सोमवार, श्री.मोरेश्वर रबडे,पुणे

     श्री.मोरेश्वर रबडे, पुणे प्रवचन सत्रात 7 वे पुष्प गुंफले.  निरुपणात त्यानी भगवत्गीतेतील 9 व्या अध्यायावर विचार मांडला.हा महत्वाचा , परमार्थाच्या अनेक कल्पना, हि-याप्रमाणे चमकणारा, विचाराची शृंखला तयार करुन अमृतपान करविले. राजविद्या राजगुह्य योग हा 9 वा अध्याय पु.गुरुदेवांना आवडता विषय.हे गुह्यतम ज्ञान गुप्त गुढ असे ज्ञान, ब्रह्मज्ञान (आत्मानुभूतिचे स्वरुप) आहे. हे श्रवण करुन त्याचा अनुभव घेतल्यास, या मायाचक्र –   जन्म मरण फे-यातून मुक्ति लाभते. ज्ञानेश्वर वचनामृतातून विचार मांडतात. 

(14) आत्मा द्रष्टा व प्रकृति कत्री (ज्ञा.9/110-129)

     साक्षात्कार हे तत्वज्ञानाचे व्याकरण आहे. गुरुदेव म्हणतात, ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञान हे भ.गीतेच्या तत्वज्ञानावर आधारलेले आहे. त्यातील मुख्य प्रकृति पुरुष यांचा संबंध होय. पुरुष कांही करत नाही.प्रकृति सर्व करते. प्रकृति शरीरात जागृत असून जागत्या पुरुषापासून दूर राहते. पुरुष हा प्रकृतिमध्ये लोपून जातो. काकासाहेब म्हणतात,प्रकृति सर्व करते. प्रकृति उदयोस्तु असते. प्रकृति माया नावाने ओळखते. ही अस्थिर असते. नामानी प्रकृतिच्या पलिकडे जाऊ शकते. प्रकृति चंचल आहे.प्रकृति म्हणजे संसारातील सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ.नामानी प्रकृतिच्या पलिकडे जाता येते. माया हे दृष्य जग म्हणजे प्रकृति. अजातवाद/मायावादातून बाहेर पडले पाहिजे.ईश्वर नाही म्हणणारे बुध्दीवादी. रामदास म्हणतात, ‘’रिता ठाव या राघवेवीण नाही’’ म्हणून नामाची कास धरुन मायानदी (प्रकृति) ओलांडता येते. 

(36) देवाचा जगताशी संबंध (ज्ञानेश्वरी – 9/286-293)

नामरुपाच्या ओलाव्यात देव असतो. अनन्य शरण येणा-याला देव जवळ करतो.

 ब्रह्म रुपाने  हा सर्व भूतात आहे. सृष्टी क्षय मीच घडवून आणतो. ज्ञानदृष्टीने पाहिले असता देव/ब्रह्माचे स्वरुप जाणता येते. 

38. ईश्वराला स्थूल दृष्टीने पाहणे हे पहाणे नव्हे. (ज्ञानेश्वरी -9/140-152)

     ईश्वराचा प्रत्यय स्थूल दृष्टीने होऊ शकत नाही. ज्ञानदृष्टीने अवलोकावे लागते.

39.ईश्वरास मानुष्यधर्म लावणे हें चुकीचे (ज्ञा.9/156-171) 

    मला अनाम्याला अनंत नांवाने संबोधतात. मी विदेही असून मला देहधर्म लावतात. मी वर्णहीन/गुणातीत/अवयव विरहीत अस माझ स्वरुप आहे. पण जग मला मनुष्य रुपात पहातात. मला बाल, तरुण, वृध्दत्व नाही. पण त्याही स्वरुपात पहातात. पु.अंबुराव महाराजाना  प्रकाशाच्या स्वरुपात महाराजांच दर्शन झाल. 

45.ज्ञान हे ईश्वरापुढे अज्ञान होय. ( ज्ञा.9/367-381)

    गुरुदेव म्हणतात – आपला शरीरभाव सोडल्यावाचून, गुणातीत होऊन , सर्व संपत्तिची कुरवंडी केल्यावाचून देवाचे स्वरुप कळणे शक्य नाही. 

63. अखंड अगर्वता (ज्ञा.9/22-227)

     अमानित्व गुणच ‘’अखंड अगर्वता’’ या सदराखाली ज्ञानेश्वरानी अध्याय 9 मध्ये वर्णिला आहे. सर्व जगच देवाचे स्वरुप आहे. त्यात लहान,मोठा हा भेद उरत नाही. उंचीवरील पाणी जसे नम्रपणाने खाली येते, त्याप्रमाणे सर्वाशी नम्रतेने वागावे.

      राजविद्या व राजयोग या 9 व्या अध्यायातून ब्रह्मज्ञानाच्या स्वरुपाचे वर्णन –आणि त्यातून साक्षात्काराने योगी-ज्ञानी आत्मत्वाने जाणून ‘ब्रहमविद् ब्रह्मैव भवति’’या श्रुतीत सांगितल्याप्रमाणे  ब्रह्मरुपतेस  प्राप्त होतात  म्हणजे सत्-चित-घन् निरतिशयानंद ब्रह्मच होतात. निरतिशयानंद प्राप्ति आणि सकल संसार दुःख निवृत्ति हे मोक्षाचे स्वरुप होय.

।। राजाधिराज सद्गुरुमहाराज की जय ।।

सोलापूर, 27.07.2020,सोमवार.VINAYAK KULKARNI

 PRAVACHAN OF RABADE KAKA

।। श्री सद्गुरु समर्थ ।।

श्रावण मास साधना सप्ताह –दि. 28.07.2020 श्री. मोरेश्वर रबडे,पुणे

     श्री. रबडे, निरुपणकारानी भक्तिने साक्षात्कार होतो.त्यासाठी सद्गुरुनी दिलेल्या नामानी अंतःकरणापासून साधना केली असता, दुःखाची तीव्रता कमी होऊन साधना दृढ होऊ लागते. 

     साक्षात्कार हळूहळू/क्रमाक्रमाने/पायरी पायरीने दृढतेने करावे लागते. भक्तिची परमावधी होण्यास दीर्घ काळ लागतो. जस जसी भक्ति ही अंतःकरणापासून दृढतेने होऊ लागते, तसतसे साधकाचा भाव वाढत जातो. प्रेमपुर्वक केलेल्या नामस्मरणामुळे सद्गुरुवर विश्वास वाटू लागतो. त्यातूनच भाव निर्मिती होते. भूमिती श्रेणीने सद्गुरुवर भाव वाढू लागतो. देव भावाचा  भुकेला असतो. मग गुरुकृपेचा वर्षाव भक्तावर होतो. 

     विषय तेथे दुःख आहे. ते जागृतिने बाजूला सारले पाहिजे. विषय वाईट नसतात. पण विषयाचा अतिरेक वाईट,तो टाळावा. त्याची  परिणिती ‘’विषय त्याचा झाला नारायण’’ होतो. भक्ताच्या अंतःकरणात भक्तीची बीज खोलवर रुजु लागतात. भक्तात हळूहळू परिवर्तन घडू लागत. म्हणोनि ज्ञानेश्वर माऊली म्हणते. ‘’झडझडोनी वाहिला निघ । ईये भक्तिचीये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम  माझे।‘’ ईश्वराबद्दल दृढ भावना तीव्र होते. एकविध भक्तिचे वाटे मार्गक्रमण सुरु होते. 

     परमार्थाला पुरक अश्या सर्व आवश्यक गोष्टी परमेश्वर पुरवितो. त्यावेळी आपली सर्व क्रिया/कर्म देवप्राप्तीसाठी वापरावी. अनन्य भक्तिकडे वाटचाल सुरु होते. ‘’मिळोनी मिळतचि असे। समुद्री जळ जैसे । मी होऊनी मज तसै । सर्वस्वे भजती । जो अनन्य यापरी मी जाहला ही माते वरी ।‘’ 

     जेष्ठ साधकाकडून शिकायला मिळते. त्यांचेकडून अनुभव ऐकावे. सद्गुरु बरोबर झालेला संवाद ऐकावा. त्यांची शरणागतिची भावना अवलोकावी. त्यामूळे साधकाची भक्तातील शरणगमन भक्ति दृढ होत जाते. श्री अंबुराव महाराजाना   संसाराची आस होती. पण महाराजानी त्यांच्या अंतःकरणातील गुण ओळखिले.आणि सक्तिने नाम दिले. तत्क्षणी बाबात परिवर्तन होऊन एक भाव/एक दृष्टी ठेऊन अखंड नामस्मरण केले. त्यांच्यात परिवर्तन होऊन सद्गुरुभाव जागृत झाला. डोळ्यापुढे प्रकाशच प्रकाश दिसू लागला. पुज्य गुरुदेव आपले आजार बाजूला सारुन, नाजूक तब्बेत असतानासुध्दा इंचगिरी सारख्या खेड्यात जाऊन महाराजासमवेत सत्संग केला. इतर जेष्ठ साधकांच्या सहवासात त्यांची साधना दृढ होत गेली. महाराज म्हटले की त्यांचा जीव की प्राण. महाराजावरील तीव्र भाव भक्तिने त्यांची तब्बेत सुधारली. भक्तिची उर्जा नामस्मरणाने तीव्र होते.

     दुराचारीसुध्दा साधु होऊ शकतो. उदा. वाल्याचा वाल्मिकी. दरेडोखोर निंबाळला दरोडा घालण्याच्या उद्देशाने आले होते. तेव्हा बाहेर बसलेले दरेडोखोराना पु.गुरुदेवांनी पाहिले. गुरुदेवांनी त्यांना आंत बोलाविले आणि  जेवण दिले. अजाणता त्यांना सद्गुरुच्या हातचा प्रसाद मिळाला. ते गुरुदेवांना म्हणाले, उपजिवेकेसाठी आम्ही चोरी करतो. गुरुदेव म्हणाले , कर्म करा पण कबुल करा. त्यांचा हृदय पालट झाला. आणि उर्वरीत आयुष्यात भाजीपाला विकून उदरनिर्वाह करु लागले. हा सत्संगाचा परिणाम.

      जातपात हे शुद्र विचार मनातून झटकून टाका. त्यातून बाहेर पडा. गुरुदेवांना सर्वाबद्दल अत्यंत प्रिती. आश्रमात दुजाभाव नव्हता. येथे आलेला साधक, अंर्तबाह्य भक्तीने परिपुर्ण भक्त होऊन जातो. देवावरील दृढ भावनेने भक्ताचा इतर पसारा कमी होऊन जातो. विखुरलेला ‘’मी’’ गुरुभक्तित एकाग्र होतो. भक्तीशिवाय जीवन व्यर्थ आहे. अखंड नामस्मरणाने अंतःकरणात भक्ति रुजते. भक्त सद्गुरुबद्दल हळुवार होतो. ‘’ऐसे माझे नामघोषे । अवघे जगति महासुखे । दुमदुमली ।‘’अश्या लीन झालेल्या भक्ताच योगक्षेम देव/सद्गुरु वहातात. श्री गुरुराव देशपांडेना कंत्राटी पध्दतीने नोकरी मिळाली. सुरवातीस एक दोन महिने मिळत असे. कधी कधी मध्येच खंड पडत असे. अश्या विवंचेनात असता, ते शारक्काकडे गेले. ते कथन केले. काळजी करु नका. त्यांचे घरी गुरुदेवापुढे कापूर लावला. घरी आलेवर समजले की त्यांना एक वर्षाच काम मिळाल आहे. गुरुकृपा बरसू लागली. घर अन्नधान्याने भरल. मुलीला पसंति आली. लग्नही ठरल. लग्नात शंकररावानी पुढाकार घेतलल. देव भावाचा भुकेला. भाव हा परमार्थाचा केंद्र बिंदु. पत्र,पुष्प, तोय जरी मनापासून/भक्तिभावाने  अर्पण केल तरी तो स्वीकार करतो. म्हणून भक्तिचे नांवे एकादे फुल तरी भक्तीभावाने अर्पण करावे.

विषय इंद्रिये जड ओळखणे हेचि विरक्ती ।

चैतन्याकडे वृत्ति फिरविणे या नांव भक्ति ।

मी चित्घन वस्तुची प्रचिती शुध्दज्ञान ।

     यावरून ‘’हा देह तुझा असे’’ वाटणे, हेचि विरक्ति, भक्ति, आत्मनिवेदन आणि शरणागति.


।। राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय ।।

सोलापूर, दि.28.07.2020, मंगळवार.

COURTSEY VINAYAK KULKARNI

 ।। श्री सद्गुरु समर्थ ।।

श्रावण मास साधना सप्ताह दि.30.07.2020 गुरुवार – डॉ.अनिलकुमार,मुंबई

डॉ.अनिलकुमार कुलकर्णी, मुंबई यांनी हरिपाठातील 27वी खालील दिलेल्या ओवीवर निरुपण केले.

सर्वसुखगोडी साही शास्त्रे निवडी ।

रिकामा अर्धघडी राहू नको ।।

 हरिपाठातील हरी ‘हरण करतो, तो हरी’ दूःख दारिद्र अज्ञान हरण  करतो. हा उपसंहारात्मक सहा चरणाचा अभंग आहे. सहा शास्त्र – न्याय, वैशेषिक, सांख्य, पुर्व-मीमांसा व उत्तर मीमांसा, ही सहाही हरिचेच गुण गातात. ‘’सुखाचे सुख हरिमुख’’ असे हरिचेच वर्णन आहे. साधना, साध्य आणि सुख हे हरिचेच सुत्र आहे. ज्ञानेश्वर माऊली ‘’सुलभ सोपा भक्तिमार्ग हरिपाठातून सर्वसामान्यासाठी सांगतात. ‘’देवाचिये व्दारी उभा क्षणभरी’’ याव्दारा भक्तिमार्ग दाखवितात. येथे क्षणभर म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत. अश्या या देवव्दारी उभा राहून भक्ति रुजु करशील तर ती भक्ति तुला देवाच्या गाभा-यापर्यंत थेट हरिपाशी नेऊन सोडील. ती प्रेमाने,  आर्ततेने झाली पाहीजे. सर्व सुख्याच्या मुळाशी जी गोडी आहे त्या आत्मरुप हरिचा अनुभव घे. सर्व संसारी व्यवहार मिथ्या म्हणजे भ्रमरुप आहेत. मायिक दृष्य पसाराचा विचार, त्या बाधित करुन त्यातील चित्त काढून घे. त्याकडे दुर्लक्ष कर. मनात करुणेला जप. हरिपाठ हा चालता बोलत्या समाधिची संजीवनी आहे. सद्गुरु वचन हेच श्रेष्ठ. अन्य नाही. संकल्प काय तर ‘’प्रपंच ओसरो’’.प्रपंच हा होतच असतो. तो करावा लागत नाही. त्यातील तुझी सक्रियता कमी कर. आणि ती सक्रियता भक्तिमार्गाला लाव. परमार्थ/प्रपंचात कोणी नाही अशी वृत्ति असो. काळजी फक्त नामाची कर. काळजी घ्यायची ती सद्गुरुवरील विश्वासाची. निजवृत्ति ही माया. या निजवृत्तिला परमेश्वराकडे वळव. सर्वसुखगोडी – जीवाच मूळ स्वरुप सच्चिदानंद आहे. अंतःकरण परमेश्वर चिंतनानी भारली पाहिजे. जीवाला जीवत्व लाभल पाहिजे. ज्ञान, नीति, आनंद हे नामानी लाभो. सर्वसुख ईश्वर चिंतनात आहे. ध्यानमग्न स्थितीत मनाची स्थिती नामानी उंचावते.

     ज्ञाता आणि ज्ञेय हे एक होण्याची स्थिती म्हणजे अव्दैतावस्था. रिकामा अर्धघडी सर्वसुखाला (पारमार्थिक ) ओहोटी लावते. म्हणून नामाशिवाय राहू नकोस. सतत नामात लीन हो.’’तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तिचिये वाटे लाग । या पावसी अव्यंग । धाम  माझे ।‘’ ‘’ मन हे मिची करी । माझिया भजनी प्रेम धरी ।‘’

     मनाच्या एक कोप-यात नाम सतत हव. सद्गुरु कृपेनी नाम मिळाल आहे. एक क्षणही नामाशिवाय राहू नकोस. ‘’राम हमारा जप करे’’ ही अवस्था भक्तिप्रेमाने प्राप्त करून घे. सर्वक्षण सहस्त्रनाम होऊ दे. हेच सहस्त्रविष्णु नाम’’. गुरुदेव प्रत्येक क्षण सतत नामस्मरण,भजन,वाचन, पोथी, लेखनात मग्न असत.सतत अनुसंधान. आपल्या प्रत्येक कृतित गुरुदेवांच स्मरण असल पाहिजे. साधकाना विश्रांति नाही. सतत विविध प्रकारच्या स्मरण,वाचन, भजनात व्यस्त असल पाहिजे. त्यामुळे ‘सर्वसुखगोडी’ उंचावते.बाबा म्हणत नारायण, नारायण हेच सत्य आहे. ते घट्ट पकड. आनंदच – नामच सोबत येणार आहे. सदा सर्वदा ‘मोकळी वृत्ति’ असावी. ही मोकळी वृत्ति नामाने समृध्द कर. ‘’आप है तो हरि नही । हरि है तो आप नही।‘’ मनाच्या अरुंद जागेत एका वेळी एकच गोष्ट राहू  शकते. ते म्हणजे देव-नाम-सद्गुरु हेच मनात सतत असू दे. अथवा ती रिकामा अर्ध घडी होईल. ‘’इंद्रा सवडी लपू नको’’ प्रकृतिची सबब सांगून साधनेपासून लांब राहू नकोस. ‘’चिंटी चावल ले चली । बीच मे मिल गइ दाल । कह कबीर दो ना मिले । इक ले दुजा डाल।‘’ प्राक्तनानी जे मिळत त्याचा सद्गुरुप्रसाद म्हणून स्वीकार कर. जादा मिळण्यासाठी धडपड करो नकोस. सर्व संसारी प्रत्येक वस्तुसुध्दा देवापुढे ठेव आणि तुझ्याकृपेने हे मिळत, ही भावना असू दे. त्यामूळे सद्गुरु शरणगमनवृत्ति वाढते. परमार्थाचे शिखर म्हणजे सर्वस्व अर्पण. तेव्हा देवाच सानिध्य लाभत.त्याला करुणेने जवळ कर.

लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्यातुनिया ।

त्यासारखे तुम्ही जाणा साधु वृत्ति । पुन्हा न मिळती मायाजाळ ।

मीठ जसे पाण्यात विरघळून जाते, त्याप्रमाणे तुम्ही या ‘सर्वसुखगोडीत’ एकरुप व्हा. ‘मी’चा नाश झाल्यावर अविनाशी आनंद हेच आत्मानंद. 

सदा विषय चिंतिता विषवल्ली वाढते. विषय चिंतनाच पाणी तोडा आणि ते परमेश्वर चिंतनाकडे लावा. म्हणजे भक्तिच रोपट जोमान फोफावत. आंधळ्याने दोरी ओढल्यासारखे नाम घ्या. सतत चिंतन भगवंताच होऊ दे. भगवंताला विसरण्यासारख पाप नाही. निजवृत्ति – या सर्व मायेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी ईश्वर चिंतनाला/नामाला लावा. देव हा नामानी अंतःकरणात प्रतिष्ठित करायचा आहे. आणि ते सद्गुरुकृपेनी होतो. म्हणून सतत भजननामात रहा. महाराज बाबाना म्हणाले ‘’ निन् सेवा –काय वर्णू’’. अशी सद्गुरुकृपा पाहिजे. नाम हेच ‘’सर्वसुख गोडी’’ झाले पाहीजे. हीच सद्गुरुकृपा – हेच अव्दैतावस्था.

।। राजाधिराज सद्गुमहाराज की जय ।।


सोलापूर, दि.30.07.2020

9921659780.

 ।। श्री सद्गुरु समर्थ ।।

श्रावण मास साधना सप्ताह दि.01.08.2020 आणि 02.08.2020 सौ.मिनलताई कुलकर्णी, पुणे यांचे प्रवचन पुष्प यांनी गुंफले. या दोन दिवसात प्रवचन एकाच पदावर असलेने त्याचे एकत्रित सार खालील प्रमाणे आहे.

सद्गुरुरुपी सुर्य (चित्सुर्य) उगवल्यावर खर ज्ञान होते. आणि मायारुपी अज्ञान अंधाराचा नाश होतो. ज्ञानरुपी सुर्याने आत्मबोधाचा लाभ होतो, अस सद्गुरुच स्मरण करुन –नमन करत आजच्या प्रवचनाची सुरवात केली.

आजच्या प्रवचनासाठी त्यांनी तुलसीदासाचे पद –‘’9.The chariot of spiritual victory’’- जेहि जय होइ सो स्यन्दन आना ।। सौरज धीरज तेहि रथ चाका । सत्य, सील दृढ ध्वजा पताका ।।‘’ हे 6 कडव्याचे पद घेतले. त्यावर विस्तृत भाष्य त्यानी निरुपणात केले.

हा विजयरथ, आयुष्य सार्थक करण्यासाठी/परमार्थ प्राप्तीसाठी/अमोलिक लाभासाठी निघाला आहे. या रथाचे वर्णन यथार्थपणे या पदात तुलसीदासाने केले आहे. ह्या रथाचा रथि –चालक – हा भक्तियुक्त अंतःकरणाने हा रथ विजयाच्या दिशेने घेऊन जात आहे. केवळ जीवनातील अत्युच्च ध्येय –जीवन साफल्यासाठी/परमेश्वर प्राप्तीसाठी – भक्तिपुर्ण अंतःकरणाने हा रथ हाकीत आहे. तो पुर्णपणे सावध आहे. त्याची उत्कट ईच्छा देवप्राप्तीचा आहे. एकदा गुरुदेव एका गृहस्थास म्हणाले,  जा बाजुच्या खोलीत जाऊन एकच विषयावर उत्कटतेने ½ तास चिंतन कर.आपली उत्कट ईच्छा असेल तर, परमेश्वराव्यतिरीक्त इतर विचार मनात येणार नाहीत. असच या रथीच्या मनात देवप्राप्तीचा विचार आहे. त्या विषयावर तो ठाम आहे. भक्तिभावाने तो परमेश्वराला आळवित घोडदौड करत आहे. पुढे तुलसीदास या रथाच परिपुर्ण वर्णन करतात. प्रामुख्याने परमार्थाला आवश्यक अश्या नीतिमार्गाच अवलंब आवश्यक आहे. या नीति मार्गाची उदाहरणे देत त्याचा तपशील देत आहेत. 

रथाच चाक, ज्याच्यावर रथाचा भक्कमपणा आणि वेग अचलंबून आहे ते शौर्य आणि धैर्य आहे. आगेकुच करायला धैर्य लागत. आणि अडथळ्याच्या शत्रुला गारद करण्याला शौर्य लागत. म्हणजे वाटेतील शत्रु नेस्तनाभूत होतील. आणि रथाची आगेकुच वेगाने होईल.

या रथावर कस स्थिर आरुढ व्हायच तर नासाग्री दृष्टी ठेऊन – one pointed नजर आपल्या लक्षावर ठेऊन रथ वेगान ध्येयाच्या दिशेने घेऊन जायच.अन अजिबात विचलीत होऊ द्यायच नाही. देव तुला विजयाच्या दिशेला घेऊन जाणार आहे, असा मनात दृढ विश्वास पाहिजे. ईश्वरीप्रेम संपादून सद्गुरुच्या सहवासात राहून –अलोट कृपा मिळव. तुझ्या अतुट ध्येयावर सद्गुरुकृपा होईल. 

तुझ्या रथावर ध्वजस्तंभावर ऐश्वररुपी देवाचा  ध्वज फडकत आहे. आणि विजय पताका डौलाने मिरवत आहे. 

विजयाकडे धावणा-या या रथाला चार घोडे आहेत.

बल – धष्टपुष्ट, चपळ असा घोडा आहे. 

विवेक – दुसरा घोडा विवेकरुपी आहे. तो योग्य मार्गावर आक्रमणाकडे –ध्येयावर लक्ष ठेऊन आहे. 

दम – तिसरा घोडा दमदार,समाधान आणि आत्मध्यान यांच्या साहाय्याने सर्व सर्व वाटेतील आडव्या येणा-या शत्रुला नेस्तनाभूत करत रथाचा वेग नियंत्रित करतो. रथीच्या मनातील अचानक उसळणारे  विकल्प  धीराने बाजूला सारून, रथावर नियंत्रण ठेवणारे, ईश्वरी प्रेमास दम,संयम, अत्यंत आवश्यक ठरतात. 

परोपकार – चौथा घोडा परमार्थाला सहाय्यक असा परोपकार गुण आहे. त्याशिवाय भक्तिची गुणवत्ता वाढत नाही, यात – दुस-याच हित जपणे हा उद्देश आहे. 

असे विजय रथाचे चार घोडे विजयाकडे कुच करत आहेत. 

रथाला बांधण्यासाठी क्षमा,कृपा आणि समतारुपी तीन लडीची पिळदार दोरीने

घोडे रथाला बांधले आहेत. 

क्षमा – ही ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या मनाची सुंदर बांधणी/वीण  होते. 

कृपा – सद्गुरुकृपेने सर्व साध्य होते. प्रसाद लाभतो. त्यामुळे तुमची वाटचाल परमार्थ पथावर तीव्र गतिने घडते. 

समता – हा परमोच्च विचार आवश्यक आहे. हा भाव अंतःकरणात दृढ होतो. हे सर्वच सद्गुरुची लेकर आहेत. आपली भावंड आहेत, हा भाव दृढ होतो. कोणीही शत्रु नाही.

हा रथी – रथ चालविणारा ईश्वरचिंतनात आपल सर्वस्व अर्पण करून रथावर आरुढ झालेला आहे. जणू कांही सद्गुरुच रथ चालवित आहेत असा त्याचा विश्वास आहे. श्रध्दा आहे. प्रेयसकडून श्रेयसकडे तो पुर्णपणे वळलेला आहे. गुरुवाक्य हेच त्याच प्रमाण. हेच ध्येय. 

विश्वास आणि भाव कसा वाढतो हे गुरुदेवांच जीवनच मार्गदर्शन करत. पु.गुरुदेव अत्यंत प्रकृती क्षीण झालेली होती. 1910 साली ते श्रावण मास सप्ताहात महाराजाबरोबर 6 आठवडे होते. इतर जेष्ठ साधकाबरोबर साधना करत त्यांना सत्संगाचा लाभ झाला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. महाराजावरील विश्वास  दृढ झाला. नेमात अतीव समाधान लाभत होते. अशी ही साधना म्हणजे रथाची विजयाकडे वाटचाल. त्या वाटचालीला  सद्गुकृपा लाभते. गुरुदेव कृपेविषयी म्हणतात,’’ Grace is not justice but it is more super jistice’’.

यम/नियम – रथीच्या पाठीवर भात्यात यम, नियमाचे बाण आहेत. हे बाण क्वचित प्रसंगी वापरायचे आहेत. केवळ धाक दाखविण्यासाठी वापरायचे आहे. प्रेमाने शत्रुला –नव्हे केवळ अडथळे आणणा-याला – दूर सारायचे आहे. यात तुमच्या सहनशीलतेची, भक्तिची कसोटी आहे.

सद्गुरुकृपा लाभून हा रथि विजय मार्गाकडे कूच करीत आहे.

पु.गुरुदेव म्हणतात, The spiritual Master is the impenetrable amour  of the warrior which no arrows can pierce, and which might therefore be called in the inimitable equipment in his victorious journey through life. एहि सम विजय उपाय न दूजा ।‘’

अमानित्वावर गुरुदेवांचे दर्शन नव साधकाना कसे घडले. ती घटना. सौ. वसुधा मोडक प्रथमच निंबाळला आले होते. त्यानी पुर्वी कधीहि गुरुदेवांना पाहिले नव्हते.त्यांच्या कल्पनेतले गुरुदेव वेगळेच होते. ते रुबाबदार/भारदस्त व्यक्तित्व असतील. ते जागतिक किर्तीचे तत्वज्ञ होते. त्यांच आगमन जयजयकारात होईल. सर्वजण त्यांना नमस्कार करतील. आगमनाची आतुरतेने वाट बघत होते. पण सिटिंग सुरु झाले. सर्वाचे लक्ष एका व्यक्तिकडे होते. ती कृश होती. सर्वजण त्यांना संबोधित होते. त्यावरुन त्यांनी गुरुदेवच असतील हे ताडले. किती लीनता मोठेपणाचा लवलेशही नाही. नमस्कार करुन घेण नाही. अशी ही संताची वृत्ति असते. साधेपणा असतो. अश्या वृत्तिचे सद्गुरु हा विजय रथ चालविण्यास प्रोत्साहीत करतात. असा महत्भाग्याने आपणाला सद्गुरु लाभले, कृपारुपी नाम मिळाले.आपण साधनारुपी पुष्पहार गुंफून त्याना शरणगमनवृत्तिने प्रार्थना करत हा हार त्याना अर्पण करु या. असच आमच्यावर कृपादृष्टी बरसू दे. 

सोलापूर, 2.08.2020

भ्रमणध्वनि -9921659780.Courtsey Vinayak kulkarni

 ।। श्री सद्गुरु समर्थ ।।

श्रावण मास साधना सप्ताह, दि. 03.08.2020 सोमवार  -डॉ.सौ.अमृता दात्ये, चिंचवड, पुणे.

कै.मामासाहेब दांडेकरानी म्हणतात मनुष्य हा त्यांच्या ग्रंथात असतोच,म्हणून तो नक्कीच सांपडतो. असच आजपर्यंत अनेक निरुपणकारानी या साधन सप्ताहात विविध वचनामृत, ज्ञानेश्वरी, हिंदी संत पदातून, पु. गुरुदेवांचे विविधांगी चरीत्र वर्णिले आहे. तसेच आज डॉ.सौ.अमृताताईनी ‘’गुरुदेवांचे जीवन दर्शन’’ भारतीय तत्वज्ञानाचे मूळ स्त्रोत – वेदवाङमय, उपनिषद, भ.गीता, ब्रह्मसुत्र, सांख्य योग, यातून घडवितात. आज जगात माहिती तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. ‘साठवण शास्त्र’ आज डिजिटलच्या माध्यमातून होत आहेत. पण निरुपणकारानी आपले सद्गुरु म्हणजे भारतीय मूळ तत्वज्ञानाचे चालते,  बोलते, लिहिते- विध्यापीठ आहे, हे प्रतिपादले आहे.

पु..गुरुदेव जीवघेण्या आजारानी त्रस्त होते. भ.गीतेतील ‘’ मचित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि । ‘’ या भगवत् आश्वासानी दिलासा मिळाला आणि महाराजाच्या कृपेने, आणि त्यांच्या सत्संगतीत राहून आजारातून बरे झाले. 

‘स कालेनेह महता योगो नष्टः परंतप।‘ भ.गीता 4.2 . पु.गुरुदेव म्हणतात, ‘’चांगल्या गोष्टीनाही नाश आहे. म्हणून योगज्ञानाची गंगा फल्गुनदी प्रमाणे गुप्त होते. मग थोर साक्षात्कारी पुरुष त्या ज्ञानाचा पुन्हा प्रसार करतात.’’  ‘लोक विषयलोलुप झाले, त्यांना ईश्वराच्या ज्ञानाची इच्छाच उरली नाही,’ हे योग नष्ट होण्याचे कारण ज्ञानेश्वरानी दिलेले आहे. ‘’तैसी वैराग्याची शीव न देखती.....म्हणोनि योगु हा लोपला। लोकी इये’’।(ज्ञा.4/25-27).  हेही  आता खरे आहे.गुरुदेवांच्या पश्चात  कोणीही साक्षात्कारी संत या संप्रदायात नाही. पु.गुरुदेवांचे निर्गुण स्वरुप वाङमयाच्या रुपाने सगुण होऊन, आणि संजीवन समाधिकडून आजेही नव साधकाना मार्गदर्शक ठरत आहेत. गुरुदेव ठासून सांगतात, ‘’What is Novelty to World – ‘’God Realisation.’’ साक्षात्काराच्या दृष्टीने भगवत्गीतेच महत्व आहे.

आजच्या प्रवचनाचा विषय प्रवेश भगवत्गीतेतील साक्षात्कार दर्शन आणि तत्संबधी उपनिषदातील उतारे उधृत करीत गुरुदेव दर्शन घडवितात. 

1. तत्वदर्शन  2.वेदांत तात्पर्य, -साक्षात्कार. 3. आधुनिक तात्पर्य, 4. चक्रव्युहातून बाहेर पडण्याची गुरुकिल्ली, 5.भव्योदात्त व दिव्य तत्वज्ञानाचे तौलनिक दृष्टीने चर्चा.

भाग पहिला – प्राचीन तत्वदर्शन समालोचन. भगवत्गीतेत उपनिषदाचा सार – सगळ्या उपनिषदातील प्रमुख तत्वदर्शनाचा तपशील.

1.इशोपनिषद – यात प्रामुख्याने कर्मयोगाचा विषय आहे. आणि भगवत्गीतेत सविस्तर चर्चिला आहे. कर्म करुन कर्मबंधनातून मुक्त व्हायचे आहे. फल आशा रहीत कर्म करायचे आहे. म्हणजे कर्मफळाचे बंधन येत नाही. म्हणजे निष्काम करण्याचे महत्व गीतेत प्रतिपादले आहे. 

दुसरा विचार साक्षात्कारासंबधी – ईश मध्ये साक्षात्काराच्या अनुभवाचे वर्णन जवळ जवळ पुर्णतेला गेले आहे. ‘ – ’ तदेजति तन्नेजति’’ ईश.5.ईश्वराचे तेज, रुपाचे, दर्शन आहे.

2.कठोपनिषद – ‘’अश्वत्वं’’ या उदात्त कल्पनेचे मूळ कठोपनिषदात सापडते. ते भगवत्गीतेत अध्याय 15 मध्ये सविस्तर चर्चिले आहे. ‘’उर्ध्वमूलोऽवाक्शाख एषोऽश्वत्थः सनातन’’ आणि भगवत्गीतेत ते अ.15-1 ते 3 श्लोकात असत्य म्हणते, तर कठ म्हणते सनातन – सत्य म्हणते. विचारात भिन्नता आहे. 

3.मुंडकोपनिषद – विश्वरुपता – ही कल्पना भ.गीतेत अध्याय 11 मध्ये सविस्तर चर्चिली आहे. आणि त्याचा संदर्भ पुरुषसुक्तातही सापडतो. ‘’चद्रमा मनसो जातश्चक्षो सुर्याऽजायत ।

दुसरी गोष्ट गीतेत कर्मकांडाविषयी अनुकूल प्रतिकुल आहेत तसेच मंडुकोपनिषदातही आहेत. 

4. छांदोग्य उपनिषद – अंगिरस व देवकीपुत्र – कृष्ण – ही विशेष नामे आली आहेत. नंतर पांच सद्गुणाचा तप, दान, आर्जव, अहिंसा, सत्यवचन विचार आहे. अंतःकाळी ‘’अक्षितमसि, अच्युतमसि, प्राणसंशितमसि या विचाराचे ध्यान करावे असे सांगितले आहे. छांदोग्यातील 5 सद्गुण भ.गीतेच्या अध्याय 16-1.2 आले आहेत. छांदोग्य हे सामवेदाचे उपनिषद आहे. तर गीतेत सामवेदाला सर्व वेदामध्ये उत्तम स्थान दिलेले आहे. 

5. श्वेताश्वतरोपनिषद – राजयोगासंबंधी विचार – योग मार्गाचे आहेत. ते गीतेत 6व्या अध्यायात आलेले आहेत. योगसुत्रावर पतजंली ऋषिनी सविस्तर विचार मांडले आहेत. गीतेत ‘’प्राणापान समेकृत्वा – नामात गुंतून मनाचा संयम आणि नामाने आत्यंतिक सुख मिळते. 

6. सांख्य आणि योग दर्शन वेगळे नाही. .त्रिगुण कल्पना सांख्यातून आलेली आहे. आणि भ.गीतेत अ. 14 मध्ये .गुण विचार आहेत.

7.ब्रह्मसुत्रात – उत्तरायण आणि दक्षिणायन हे दोन विचार आहेत.योग्याला मृत्यु नंतर कोणतीची गति मिळते, संबंधी सुत्र आहे. देवयान  व पितृयान या दोन मार्गाचा उल्लेख ऋग्वेद नंतर उपनिषदे,  व त्यानंतर गीता आणि ब्रह्मसुत्रात आहे. पण ब्रह्मसूत्रात विकास दृष्टीस पडतो. पितृयान पितरांचा मार्ग, उपनिषदात त्यांना अर्चिमार्ग, धूममार्ग ही नांवे दिली आहेत. छांदोग्यमध्ये – श्रध्दा व तप यांची उपासना करतात ते अर्चिमार्गाने जातात व जे यज्ञ दान यांची उपासना करतात ते धूम मार्गाने जातात. गीतेत या मार्गाला शुक्ल-कृष्ण व उत्तरायण –दक्षिणायन म्हणतात. उत्तरायणात मरण येते ते अग्निमार्गाने जातात. दक्षिणायनात मृत्यु येतो ते धूम मार्गाने जातात. कोणत्या काळात मृत्यु येतो त्यावर मोक्ष अवलंबून नाही, तर ज्यांच्या अंगी नैतिक व आध्यात्मिक उन्नतिवर अवलंबून असते. क्षेत्रक्षेत्रज्ञाचा सिध्दांतग्रंथ म्हणजे ब्रह्मसुत्रेच होत.वेद उपनिषदे या खेरीज ब्रह्मसुत्रे हेही ईश्वराचे अस्तित्व सिथ्द करणारे आणखी एक प्रमाण आहे. 

।। राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय ।।

सोलापूर – 3.08.2020 

भ्रमण ध्वनि - 9921659780