Sunday, June 26, 2016

देहि मे तव दास्य योगं (पुष्प २)
महिपती दास : हठयोग-भक्तीयोग संगम (भाग ४)
गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवली आणि त्यामुळे माझ्या भास्कर गुरूंमुळे मला आत्मस्वरूप समजले. ज्ञानयुक्त आनंद आणि आनंद युक्त ज्ञान मला मिळालं म्हणून दास म्हणतात "भास्कर गुरू दयकरूणा" आता याचं अजून विश्लेषण करायचे ठरवले तर आपण म्हणू की दया आणि करूणा याचा अर्थ एकच आहे मग ही पुनरुक्ती दासांनी का केली. जसं संस्कृतमध्ये पाकं पचति असे असते. पाक हाच पचनासाठी असतो पण तरी पाकं पचति असं संस्कृतमध्ये म्हणतात. थोडक्यात ideaची कल्पना!
पण दास इथे असं वापरतात याला अर्थ आहे, त्यामागे विचार आहे. भास्कर गुरूंनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं ही दया दाखवली आणि त्यामुळे भगवंताची करूणा मला अनुभवता आली आणि पुढे म्हणतात, भास्कर गुरू दयकरूणा । दास महिपती गे आभरणा ॥ ही करूणा हाच या महिपती दासाचा अलंकार, आभरण, खरा दागिना आहे. भास्कर गुरूंनी जे साधन मला दिलं त्यामुळे जो साक्षात्कार मला झाला त्यामुळे भगवंत आणि मी त्याचा दास आहे हे मला कळलं हेच माझ्यासाठी आभरण आहे. सोहम् साधनेतून दासोहम् साधलं गेलं. सर्वच्या सर्व दास साहित्याला कानडीतील उपनिषद म्हणतात. यातील एक-एक पदातून उपनिषदांचेच सार व्यक्त होते.
यानंतर परात्पर गुरू श्री मध्वाचार्य यांच्याविषयी दास म्हणतात,
गुरूमध्वमुनीरन्ना । मुरूपरीय तोरीदे नन्न नीन्ना ॥ हरि भक्तीय अविच्छिन्ना । समारारू धरे योळू निन्ना ॥
अखिल विश्वाला शुद्ध वेदांत देणारे आचार्य मध्वमुनी हे एक विलक्षण तेजस्वी, अमूल्य, अनर्घ्य रत्न आहेत. हे मला समजलं याला कारणंही भास्कर गुरूच. बघा हा द्वैता-द्वैत वाद मिटून दृष्टी विशाल कशी होते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. पुढे म्हणतात, "मुरूपरीय तोरीदे नन्न नीन्ना" मुरू म्हणजे तीन. तीनही अवतारात तुम्ही वेगवेगळे कार्य केले. प्रथम हनुमान अवतारात पौरूष, ब्रह्मचर्य. दुसऱ्या भीम अवतारात पौरूष, गृहस्थ आणि तिसऱ्या मध्वाचार्य अवतारात शुद्ध वेदांत, संन्यासी. पण असे फरक असले तरी एक गुण सारखाच होता तो म्हणजे हरि भक्तीय अविच्छिन्ना । अविच्छिन्न अशी श्रीहरी भक्ती. तिनही अवतारात परम विष्णुभक्ती तुम्ही केलीत. आणि तुमच्या समान, तुमच्याहून श्रेष्ठ असे दुसरे कुणी नाहीत. जगाला खरा नेमका शुद्ध वेदार्थ देणारे तुम्हीच आहात.
दास परंपरा याचा पाया हा शुद्ध भक्तीमार्ग आहे. वैष्णव धर्म हाच ज्ञानपूर्वक भक्तीमार्गावर असल्यामुळे दास साहित्यातून ते दिसतंच. महिपती दासांच्या साहित्यात मात्र भक्ती बरोबर हठयोगाचेही दर्शन होते. त्यामुळे योग आणि भक्ती यांचा संगम म्हणजे महिपती दासांचं साहित्य आहे. आपल्यातील अध्यात्मिक केंद्रे जागृत करून अंतरंग दर्शन होणे हे हठयोगाने साध्य होते. पुरंदरदासांच्या काही रचनांमध्ये याचा उल्लेख येतो. पण महिपती दासांच्या खूप रचनांमध्ये याचे दर्शन आपल्याला होते.
महिपती दासांचं साहित्य अनुभवातून आलेलं असल्यामुळे मला भगवंत दिसला या प्रकारची पदे त्यांच्यात आहेत. मुळात हे शास्त्र अनुभवावर उभे असल्यामुळे दास त्यावर जास्त भर देतात. ते एक महान साधक होते हे त्यांच्या साहित्यावरून लक्षात येते. पण त्यांच्याकडे, त्यांच्या साहित्याकडे तसे दुर्लक्ष झाले हे खरोखरंच आपले दुर्दैव.
देहि मे तव दास्य योगं (पुष्प २)
महिपती दास : हठयोग-भक्तीयोग संगम (भाग ३)
भास्कर स्वामींकडून उपदेश घेतल्यानंतर "महिपती" या नाममुद्रेने पद, रचना होऊ लागल्या. महिपती दास स्वतः माध्व सांप्रदायातील होते. शहानंगांनी, भास्कर स्वामी या अद्वैती गुरूंकडे जा असे सांगितल्यावर, ‘ते अद्वैती हे काय माझा उद्धार करणार? मी द्वैती आहे. आमचे तेवढे श्रेष्ठ आहे’ असं म्हणू शकत होते. किंवा भास्करस्वामीही, ‘तुम्ही द्वैती, तुम्ही कायम पायरीवर राहता त्यावर आमचे अद्वैत आहे. तुम्ही माध्व, तुम्हाला मी शिष्य करून घेणार नाही’ असे म्हणू शकत होते. पण असे काहीच घडले नाही किंवा कुणाच्या मनात देखील तसे आले नाही.
कारण इथे जीव योग्यता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याची जशी योग्यता तसा त्याचा प्रवास. डॉक्टर लोक सुद्धा सारख्या रोगाला सगळ्यांना सारखे औषध देत नाहीत. ज्याची जशी प्रकृती तसे त्याचे औषध. असेच इथे आहे. आणि हे नाकारले तरी उघड, दिसणारे असे सत्य आहे. विविधता, भेद ज्याअर्थी आहे त्याअर्थी तो भगवंताच्याच इच्छेने आहे आणि त्याच्या इच्छेने जे चालते ते सत्यच आहे.
भास्कर स्वामी अवधूत होते. साक्षात्कारी महापुरूष होते. त्यामुळे सर्वांकडे बघायची त्यांची दृष्टी विशालच होती, पण महिपती दासांची योग्यता तेवढी होती त्यामुळे मग ते जन्माने कुणीही असोत किंवा कुठल्याही मताच्या गुरूंकडे जावोत योग्यतेप्रमाणे साक्षात्कार तर होणारच. शाश्वत आनंद मिळणारच.
हे द्वैत-अद्वैत, सांप्रदायिक वाद आपल्या मनात असंख्य वादळे निर्माण करण्या पलिकडे काहीही करत नाहीत. कारण आपण ज्या मार्गाने जायचे ठरवतो त्यावर आपली श्रद्धा नसते. ती असती तर दुसऱ्याने आपल्या मार्गाबद्दल, मताबद्दल काहीही जरी बोलले तर आपल्यावर त्याचा परिणाम व्हायचे कारणच नाही. आणि म्हणूनच महिपती दास एका अभंगात म्हणतात, "भास्करगुरू कृपे ज्ञान लेसागि कोरू उदु उन्मना"
भास्कर गुरूंच्या कृपेने काय झालं? तर या द्वैताद्वैत, वाद-विवाद यामुळे जो उन्मनी भाव आला होता, उन्मनी हा अतिशय योग्य शब्द वापरला दासांनी. म्हणजे या मनातल्या गोंधळा पलिकडे नेऊन आत्मानुभव, त्याचं ज्ञान मला भास्कर गुरूंच्या कृपेमुळे मिळालं.
मन स्तब्ध झाल्यावर जी घडते ती खरी साधना. तोपर्यंत जे चालू असतं ते मन स्तब्ध शांत करण्यासाठी चालू असतं ती साधना नव्हे. म्हणून एक सुरेख इंग्रजी वाक्य आहे, "When self starts to think mind ceases to function." असा आत्मानुभव मला भास्कर गुरूंमुळे मिळाला. आणि हा अनुभव ज्याच्या त्याने घ्यायचा असतो. मनातले विचार हे कधी, हा अनुभव आपल्याला देऊ शकत नाहीत. म्हणून गुरू लागतो. तो हा मनातला गोंधळ घालवतो आणि आपल्याला आत्म्यापर्यंत, माझा देह, माझं नाव, माझा हुद्दा, माझं अमुक-तमुक हे सगळं म्हणजे मी नसून माझ्या आत बसलेल्या खऱ्या "मी" पर्यंत तो नेऊन ठेवतो. त्याचं यथार्थ ज्ञान आपल्याला देतो.
पण यासाठी काय हवं? हेही दास सांगतात, हे खूप महत्त्वाचं.. "नंबी नडेय बेकू ढंबकव बिड बेकू"
म्हणजे या अध्यात्म मार्गात सर्वात महत्त्वाचं काय तर, आपण जे करतो त्यावर आपला विश्वास हवा. श्रद्धा हवी. आपल्याला तुरीया, आत्मा, अनात्मा, योग अमुक तमुक काही माहित नाही, पण मला एकच मला माहितेय की, माझे जे कुणी गुरू आहेत, जे कुणी माझे इष्ट दैवत आहे त्यावर माझी श्रद्धा आहे. एवढा भाव असणंच गरजेचं आहे. त्याने बाकी सगळं आपोआप साध्य होतं.
आता हे ऐकायला, वाचायला जरी सोपे वाटलं तरी हेच सर्वात अवघड आहे. कारण बऱ्याच वेळेला आपली श्रद्धा असते असे आपण म्हणतो पण, ती काय ठरू शकते, हे पण दास पुढच्या ओळीत सांगतात, ‘ती श्रद्धा असावी ढंब म्हणजे दंभ नसावा.’
अध्यात्म मार्गात क्षणोक्षणी पदोपदी मार्गदर्शन करणारं असं माहिपती दासांचं साहित्य आहे. दंभ म्हणजे थोडक्यात आव आणणे. देवासमोर हात जोडलेले असतात पण ते मनापासून नसतं. यांत्रिकीकरण त्यात खूप असतं. हे आपल्या कडून होणार नाही आणि जे करू ते श्रद्धेने करू हा प्रयत्न आपण करूया. एका रात्रीत जमेल असं नाही पण प्रयत्नाने जमेल. अशीच प्रार्थना आपण देवाजवळ करू की तुझ्यावर खरी श्रद्धा, निष्ठा आमची असू दे. दांभिकतेने काही होत असेल तर ते दूर कर.
LikeShow more reactions
Comment
देहि मे तव दास्य योगं (पुष्प २)
महिपती दास : हठयोग-भक्तीयोग संगम (भाग ३)
भास्कर स्वामींकडून उपदेश घेतल्यानंतर "महिपती" या नाममुद्रेने पद, रचना होऊ लागल्या. महिपती दास स्वतः माध्व सांप्रदायातील होते. शहानंगांनी, भास्कर स्वामी या अद्वैती गुरूंकडे जा असे सांगितल्यावर, ‘ते अद्वैती हे काय माझा उद्धार करणार? मी द्वैती आहे. आमचे तेवढे श्रेष्ठ आहे’ असं म्हणू शकत होते. किंवा भास्करस्वामीही, ‘तुम्ही द्वैती, तुम्ही कायम पायरीवर राहता त्यावर आमचे अद्वैत आहे. तुम्ही माध्व, तुम्हाला मी शिष्य करून घेणार नाही’ असे म्हणू शकत होते. पण असे काहीच घडले नाही किंवा कुणाच्या मनात देखील तसे आले नाही.
कारण इथे जीव योग्यता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याची जशी योग्यता तसा त्याचा प्रवास. डॉक्टर लोक सुद्धा सारख्या रोगाला सगळ्यांना सारखे औषध देत नाहीत. ज्याची जशी प्रकृती तसे त्याचे औषध. असेच इथे आहे. आणि हे नाकारले तरी उघड, दिसणारे असे सत्य आहे. विविधता, भेद ज्याअर्थी आहे त्याअर्थी तो भगवंताच्याच इच्छेने आहे आणि त्याच्या इच्छेने जे चालते ते सत्यच आहे.
भास्कर स्वामी अवधूत होते. साक्षात्कारी महापुरूष होते. त्यामुळे सर्वांकडे बघायची त्यांची दृष्टी विशालच होती, पण महिपती दासांची योग्यता तेवढी होती त्यामुळे मग ते जन्माने कुणीही असोत किंवा कुठल्याही मताच्या गुरूंकडे जावोत योग्यतेप्रमाणे साक्षात्कार तर होणारच. शाश्वत आनंद मिळणारच.
हे द्वैत-अद्वैत, सांप्रदायिक वाद आपल्या मनात असंख्य वादळे निर्माण करण्या पलिकडे काहीही करत नाहीत. कारण आपण ज्या मार्गाने जायचे ठरवतो त्यावर आपली श्रद्धा नसते. ती असती तर दुसऱ्याने आपल्या मार्गाबद्दल, मताबद्दल काहीही जरी बोलले तर आपल्यावर त्याचा परिणाम व्हायचे कारणच नाही. आणि म्हणूनच महिपती दास एका अभंगात म्हणतात, "भास्करगुरू कृपे ज्ञान लेसागि कोरू उदु उन्मना"
भास्कर गुरूंच्या कृपेने काय झालं? तर या द्वैताद्वैत, वाद-विवाद यामुळे जो उन्मनी भाव आला होता, उन्मनी हा अतिशय योग्य शब्द वापरला दासांनी. म्हणजे या मनातल्या गोंधळा पलिकडे नेऊन आत्मानुभव, त्याचं ज्ञान मला भास्कर गुरूंच्या कृपेमुळे मिळालं.
मन स्तब्ध झाल्यावर जी घडते ती खरी साधना. तोपर्यंत जे चालू असतं ते मन स्तब्ध शांत करण्यासाठी चालू असतं ती साधना नव्हे. म्हणून एक सुरेख इंग्रजी वाक्य आहे, "When self starts to think mind ceases to function." असा आत्मानुभव मला भास्कर गुरूंमुळे मिळाला. आणि हा अनुभव ज्याच्या त्याने घ्यायचा असतो. मनातले विचार हे कधी, हा अनुभव आपल्याला देऊ शकत नाहीत. म्हणून गुरू लागतो. तो हा मनातला गोंधळ घालवतो आणि आपल्याला आत्म्यापर्यंत, माझा देह, माझं नाव, माझा हुद्दा, माझं अमुक-तमुक हे सगळं म्हणजे मी नसून माझ्या आत बसलेल्या खऱ्या "मी" पर्यंत तो नेऊन ठेवतो. त्याचं यथार्थ ज्ञान आपल्याला देतो.
पण यासाठी काय हवं? हेही दास सांगतात, हे खूप महत्त्वाचं.. "नंबी नडेय बेकू ढंबकव बिड बेकू"
म्हणजे या अध्यात्म मार्गात सर्वात महत्त्वाचं काय तर, आपण जे करतो त्यावर आपला विश्वास हवा. श्रद्धा हवी. आपल्याला तुरीया, आत्मा, अनात्मा, योग अमुक तमुक काही माहित नाही, पण मला एकच मला माहितेय की, माझे जे कुणी गुरू आहेत, जे कुणी माझे इष्ट दैवत आहे त्यावर माझी श्रद्धा आहे. एवढा भाव असणंच गरजेचं आहे. त्याने बाकी सगळं आपोआप साध्य होतं.
आता हे ऐकायला, वाचायला जरी सोपे वाटलं तरी हेच सर्वात अवघड आहे. कारण बऱ्याच वेळेला आपली श्रद्धा असते असे आपण म्हणतो पण, ती काय ठरू शकते, हे पण दास पुढच्या ओळीत सांगतात, ‘ती श्रद्धा असावी ढंब म्हणजे दंभ नसावा.’
अध्यात्म मार्गात क्षणोक्षणी पदोपदी मार्गदर्शन करणारं असं माहिपती दासांचं साहित्य आहे. दंभ म्हणजे थोडक्यात आव आणणे. देवासमोर हात जोडलेले असतात पण ते मनापासून नसतं. यांत्रिकीकरण त्यात खूप असतं. हे आपल्या कडून होणार नाही आणि जे करू ते श्रद्धेने करू हा प्रयत्न आपण करूया. एका रात्रीत जमेल असं नाही पण प्रयत्नाने जमेल. अशीच प्रार्थना आपण देवाजवळ करू की तुझ्यावर खरी श्रद्धा, निष्ठा आमची असू दे. दांभिकतेने काही होत असेल तर ते दूर कर.

भगवंताचे नाम हे खीरी सारखे आहे ती खीर खायला सगळ्यांनी या . ही नामाची खीर आहे तरी कशी? "रामनाम पायसक्के, कृष्णनाम सक्करे, विठ्ठलनाम तुप्प बेरिसि, बायी चप्परिसिरो" म्हणजे ही रामनामाची खीर आहे यात कृष्णनामाची साखर आहे आणि विठ्ठलनामाचे तूप आहे अशी ही खूपच स्वादिष्ट खीर आहे.
देहि मे तव दास्य योगं
महिपती दास : हठयोग-भक्तीयोग संगम
"देहि मे तव दास्य योगं" या मालिकेतून कर्नाटकातील दासपरंपरेशी आपण ओळख करून घेतो. पहिल्या पुष्पात आपण श्रीपुरंदरदासांचे चरित्र पाहिले. आता दुसऱ्या पुष्पात आपण श्री महिपती दासांचे चरित्र जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील ताहाराबादचे महितपती महाराज आणि हे महिपती दास यांचा एकमेकांशी संबंध जोडला जातो पण दोनही सत्पुरूष वेगवेगळया कालखंडात होऊन गेले.
महाराष्ट्रात जशी वारकरी संत परंपरा आहे तशी दक्षिणेत दास परंपरा आहे. दोन्हीही परंपरांमध्ये थोड्याफार प्रमाणात फरक असेलही, पण विठ्ठलभक्ती आणि संगीत या गोष्टी सारख्याच आहेत. ही सर्वच्या सर्व दास परंपरा मध्व सांप्रदायावर आधारलेली आहे. आणि इतकच नव्हे तर कर्नाटक संगीताचा उगम हा मध्व सांप्रदायातून झालेला आहे. कर्नाटकातून त्या संगीताचा उगम झालेला आहे, म्हणून त्याला कर्नाटक संगीत म्हणतात हा रूढार्थ झाला, पण ‘कर्ण’ म्हणजे कान आणि ‘अटक’ म्हणजे चांगलं वाटतं ते, कानाला जे चांगलं वाटतं ते "कर्नाटकी संगीत" असा त्याचा खरा अर्थ आहे.
या कर्नाटक संगीताचा उगम हा मध्वाचार्यांपासून होतो. त्यांच्यापुढे त्यांचे शिष्य नरहरी तीर्थ यांनी संगीता बरोबरच नृत्याची जोड देऊन "यक्षगान" हा नवीन नृत्यप्रकार निर्माण केला. त्यापुढे श्रीपादराजतीर्थ, व्यासराजतीर्थ, विजयींद्रतीर्थ, वादिराज तीर्थ आणि राघवेंद्रतीर्थ या सत्पुरूषांनीही कर्नाटक संगीतामध्ये आपले योगदान दिले. व्यासराजतीर्थांचे संगीत शास्त्रावर ग्रंथ आहेत, ज्यात त्यांनी एखादा राग, एखादे पद, कसे गावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे. या व्यासराजतीर्थांच्याच काळात म्हणजे १४व्या शतकात दास परंपरा उदयास आली. व्यासतीर्थांनी श्रीपुरंदरदासांना अनुग्रह दिला आणि पंडीतांनी आपल्याच मालकीचे ठरवलेले तत्त्वज्ञान संगीतातून, सुलभ भाषेतून जनमानसापर्यंत पोहोचवण्यास सांगितले. या पुरंदरदासांपासून ही परंपरा सुरू झाली आणि त्यात अनेक महान दास होऊन गेले. त्यातलेच एक म्हणजे "महिपती दास."
काही संत सत्पुरूषांच्या जीवन चरित्रावरूनच, ते कसे होते? याचे ज्ञान आपल्याला होते. महिपती दासांच्या बाबतीत त्यांचे जीवन चरित्र फारसे उपलब्ध नसून सुद्धा त्यांच्या पदांवरून, रचनांवरून ते कसे होते याचे ज्ञान आपल्याला होते. सांप्रदाय, विविध मते या सर्वांचे पाश तोडून परमार्थ कसा करावा, यासाठी महिपती दास हे एक उत्तम मार्गदर्शक आहेत. ध्यान करा, भगवंताला असे पहा वगैरे रचना, अभंग आपण ऐकतो पण महिपती दासांनी, ‘मी काय केलं, ज्यामुळे मला भगवंत दिसला’ हे सर्व अनुभव त्यांच्या रचनांमधून सांगितलेले आहेत. त्यांचे उपलब्ध असणारे चरित्र आणि आपल्या सर्वांना या मार्गात फायदेशीर ठरणाऱ्या त्यांच्या रचनांचा अभ्यास आपण पुढील काही दिवस करणार आहोत.
भगवान श्रीहरीचे भक्त असणाऱ्या कोणेरीराय यांचा मुलगा म्हणजेच नंतरचे महिपती दास. १६११ साली त्यांचा जन्म झाला. उपलब्ध माहिती वरून ‘काठवते’ हे त्यांचे घराणे. ‘कोल्हार प्रह्लाद कृष्णाचार्य’ यांच्याकडून त्यांनी वेदध्ययन पूर्ण केले. संस्कृत, कन्नड, मराठी, हिंदी, उर्दु, पर्शियन या भाषा त्यांना अवगत होत्या. लहानपणीच एका ज्योतिषाने, ‘हा मुलगा राज दरबारी असेल आणि नंतर एक योगी होईल’ असे सांगितले. व्यवहारातले शिक्षणंही महिपती दासांनी घेतले होते. हिशेबात चूक आली तर, "महिपती दासांकडे जाऊया, ते लगेच ती सांगतील आणि दुरूस्त करतील" असे सर्वच गावकऱ्यांच्या तोंडी असे. श्रीमद्‍ भागवत, रामायण यावरील प्रवचने महिपती दास गावकऱ्यांना देत असत. विविध भाषा येत असल्यामुळे इतर धर्मीय देखील ती प्रवचने ऐकायला येत असत.
श्री अंबुराव महाराज यांच्या आठवणी
'एक आठवची पुरे'
१९३० साली श्री बाबा साताऱ्याला आले होते. त्यावेळी, सांपत्तिक स्तिथी अगदी साधारण असलेल्या एका शिष्याने त्यांना आपणाकडे भोजनास येण्याबद्दल फार आग्रह केला. परंतु " मी एकटा जेवावयास येऊ शकत नाही, व बरोबरच्या २०/२५ मंडळींना जेवावयास बोलावल्याने तुजवर खर्चाचा फार भार पडेल म्हणून तू भोजनास येण्याचा आग्रह करू नको", असे श्रीबाबांनी त्यांना समजावून सांगितले. तरीही ते गृहस्थ आपला आग्रह सोडीनात. ते म्हणाले, " मी अंत:करणपूर्वक आपणा सर्वांना निमंत्रण देत आहे. व खर्च झाला तरी मला त्याचे वाईट वाटणार नाही.." तेव्हा श्रीबाबा म्हणाले," अरे बाबा , तू हे सर्व अहंकारामुळे बोलतो आहेस, हे तुझ्या लक्षात येत नाही. प्रपंचात पैशाची अडचण मोठी कठीण असते. आपल्या मुलाला एक आण्याचा खाऊ आणून देणे अवघड पडते. मग आमच्यासाठी १५/२० रुपये खर्च करणे जड होईलच . तुझे इष्टमित्र म्हणतील की याची प्रापंचिक स्थिती माहीत असून याच्यावर इतका भार घालू नये हे न समजण्याइतका याचा गुरु अविचारी कसा? अशा रीतीने तू परमार्थासाठी जे करणार (आम्हाला भोजनास बोलविणार) त्यामुळेच परमार्थाला हानी पोहोचेल. म्हणून तू असा आग्रह करू नको. ज्याला जी सेवा सहज करता येईल ती करून त्यांनी परमार्थ करावा. मी ज्यांच्याकडे उतरलो आहे त्यांनी मला इंचगेरीहून साताऱ्यास आणण्यास पाठविण्याला कोणी चांगला मनुष्य मिळत नव्हता. त्यावेळी, मी जातो असे सांगून तू मला घेऊन आलास ही परमार्थाची सेवा काय थोडी झाली? आता तुला प्रसादाचं घ्यावयाचा असेल तर चार आण्याची साखर भजनाचे वेळी महाराजांच्या फोटो पुढे ठेव व शेवटी ती सर्वांना वाट म्हणजे प्रसाद मिळेल. परमार्थासाठी आपल्याला जड पडेल असे काहीही करण्याची आवश्यकता नसते. सहज होईल ती सेवा करावी व नामस्मरण करावे म्हणजे पुरे. जड असे काही केल्याने त्याचा परमार्थाला उपयोग न होता त्याची हानी मात्र होते."