Thursday, September 26, 2019

।। श्री सद्गुरु समर्थ ।।
श्रीक्षेत्र निंबाळ श्रावण साधना सप्ताह 2019 - दि.30-08-2019, सप्ताह समाप्तिचे प्रवचन डॉ. अनिलकुमार कुलकर्णी, मुंबई, माऊलीचे अभंग " संताचे संगती मनोमार्ग गती" यावर चर्चा पुढे ठेवताना म्हणतात,' 'आकळावा श्रीपति येणे पंथे' आकळावा म्हणजे मायेच्या बंधनात विस्मरणाने दूर केलेला हरी आपलासा करावा. तो प्रेम आणि भक्तीने आपलासा होतो. देव हा भावाचा भुकेला आहे. त्याचे भाव भक्तिने सान्निध्य लाभते. "मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला । एक नाम हरी द्वैत नाम दूरी। विषयासक्तापासून देव लांब जातो. जेथे प्रेम आणि भक्ती आहे, जो प्रेमाने प्रार्थना करतो, त्याला देवाचे सानिध्य लाभते. जेथे मनात द्वैत आहे, संशय आहे,विश्वास नाही, त्याला देव गवसत नाही.
ईश्वराकडे जाण्याचा एकच मार्ग,साक्षात्कारी संतांच्या द्वारे लाभतो.भावेविण न कळे निसंदेह.जेथे भाव आहे, भक्ति आहे,तेथेच देवाचा वास आहे."रामकृष्ण वाचा हा भाव जीवाचा" जीवाचा भाव हा शिवाचा झाला पाहिजे. नामाचा भाव श्रेष्ठ आहे. त्या भावात गुंतलेले मन ईश्वराकडे ओढ घेते. म्हणून आत्मारामच श्रेष्ठ.
श्री बाळ शास्त्री आठवले 1920 साली पुण्याला अध्यात्मभुवनात आले. ते म्हणाले ,अरे रामराया तू रामाला श्रेष्ठ मानत नाहीस. श्री. गुरुदेव आदराने त्याना म्हणाले, 'राम राम सारेच म्हणती, न ओळखिती आत्माराम. गुरु मुखातून नाम मिळाल्यावर आत्मारामाकडे जाण्याची पायवाट सापडते.
श्री गुरुदेव बाळशास्त्रीना म्हणाले, पतंजली ऋषीनी ज्याला नमन केले आहे तो शेष आपण पाहिला आहात काय? अचानक या प्रश्नाने शास्त्रीजी गोंधळले. पु. गुरुदेव त्यांना आदराने म्हणाले, पतंजली ऋषीनी ज्या शेषाला नमन केले, तो पाच फण्यांचा शेष आता माझ्या दृष्टीसमोर आहे.
नाम कसे श्रेष्ठ आहे हे उदाहरण देऊन स्पष्ट केले. रामनामाने लिहिलेले दगड तरतो, पण श्रीरामाने टाकलेला दगड बुडाला. त्यावर हनुमानाला प्रभूनी विचारलं त्यावर भक्त हनुमान विनयाने मार्मिकपणे उत्तर दिले, ज्या दगडाचा रामाचा आधार सुटला, तो तरलच कसा.
पंधरा वर्ष साधना करणारे साधक श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी, विमान वेगाने अनुभव येतात आणि दुसऱ्या दिवशी वेग कमी होतो. कारण 15 वर्षाचे साधन श्रावणाच्
या पहिल्या दिवशीच उफाळून येत. भक्त गुरुस्थानी आला की अंतकरण मृदु होतं. त्याचा भाव वृद्धीस लागतत्यांची्ा एकदा दौऱ्यावर गेले होते. ससर्दीने त्यांना फार बेजार केले. श्वास घेणे अवघड होऊ लागले. मनात रुकावट येऊ लागले. तेव्हा तेथल्या डॉक्टरनी त्यांच्या नाकात स्प्रे मारून नाक मोकळे केले. त्यांच्या श्वासोश्वातील नाम घेणे सुकर झाले. तेव्हा ते डॉ.ना म्हणाले, तुम्ही देवासारखे भेटलात. माझं नामस्मरणातील रुकावट दूर केलेत. केवढी ही त्यांची मृदुता.
तासा तासानी नामस्मरण होतं का? याची वरचेवर नोंद घ्यावी म्हणजे नामाचे अनुसंधान दीर्घकाळ होत राहिल.
असंच नामाच महात्म अधिक स्पष्ट करतानाडॉ.नी उदाहरण दिले. एकदा माऊली आणि नामदेव मारवाड प्रांतात दौऱ्यावर गेले होते. तेव्हा ते दोघे ताहनेने व्याकेळ झाले. पाणी कोठेच दृष्टीस पडेना. एका खोल विहीरीत तळाशी पाणी होते. माऊलीनी सूक्ष्म होऊन पाणी पिऊन आले. नामदेवाला विठ्ठलाचा विश्वास. नामदेवाच्या कळकळीची अंतकरण युक्त प्रार्थना ऐकून विठ्ठलाने पाण्याचा स्रोतच नामदेवाच्या ठाई निर्माण केला. नामदेव पाणी पिऊन तृप्त झाले. ही नामाची किमया. देव भक्तांच्या अंकित होतो. श्री गुरुदेव म्हणाले नामाचं विसर शक्यच नाही. It is better to die than to forget the name of God. I do wish to I've with Nam.
नाम हा विषय श्रवण, किर्तन, वाचन, मनन यानी अंतकरण मृदु होऊन नामा चा वास सदैव राहतो. इतर आवरणानी ते साकाळता कामा नये. याची दक्षता फक्त घेत असतो. भक्तीभावाने साधना केली असता देव नाम रूपाने भक्तांच्या अंतकरणात सतत वास करतो. सत्संगाने जे होईल ते इतर मार्गानी होणार नाही. सत्संगाने भक्त हा सतत भक्तीच्या वाटेवर असतो. म्हणून सतत गुरु सान्निध्यात येणेचे महत्व. अनुसंधानात बाधा येत नाही. भावभक्ती वाढते. सद्गुरू वर श्रद्धा दृढ होते. सद्गुरुच सर्व कर्ता आहे हे उमजत. मनातील सर्व द्वंद लयास जात. मनात प्रेम भक्तीचा ओलावा सतत टिकतो. One pointed devotion ने मन एकाग्र होऊन नामात स्थिर होतं. म्हणजे सतत विषयात रमणारे मन देव मार्गाकडे वळते." विषय तो त्याचा झाला नारायण" या शब्दात संत भक्ताची थोरवी वाढवितात. तेव्हाच 'एक तत्त्व दृढ धरी मना । हरीसी करुणा येईल तुझी।,' याचे मर्म भक्त जाणतो. नामच हे सार आहे. बाकीचे असार. द्वैताचे बंधन तुटते म्हणजे संशय/ विस्मरण लयास जातात. हृदयात आत्मारामाचा सदा वास राहतो.' ब्रह्म सत्य जगन्मिथ्या' याची जाण येते. सद्गुरु नाम देतात तेच ब्रह्म आहे.' नामामृत गोडी वैष्णवा लाधली' भक्ताला हे अमृतनाम लाभतं.. तहानभूक हरपते. भक्ताच्या प्रत्येक पेशीतून हे अमृत स्त्रवू लागते.
" विठ्ठल विठ्ठल गजरी" भक्तीपर
पद ऐकत असता, श्री गुरुदेव विठ्ठल नामात तल्लिन झाले. नामामृत आज घटाघटा प्यालो असे महाराज म्हणत असत. आनंदाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आनंद हेच ब्रह्म. नित्य नवा आनंदाचा अनुभव येतो. तो देवा जवळ घेऊन जातो . नव्हे नव्हे देवच भक्ताकडे धावत येतो. अशी भक्ती अंतःकरणात सदा वास करो. सद्गुरु तुमच्या अंतकरणात आला तर तुम्ही तरुन जाल. माझ्या सद्गुरुनी अध्यात्मिक क्षेत्रात साक्षात्कारी संता पर्यंत अनुभव दिला.
कदायुला नारदाकडे सुपूर्त केले. तिला नारायणाचा जप सांगितला. प्रल्हादानी तो गर्भात असताना ऐकला. प्रल्हादाची निष्ठा नामावर स्थिर झाली. उद्धवाला गुरुदेव सर्वोच्च भक्त मानत. उद्धवला कृष्णावर गाढ श्रध्दा होती.
असे नामाचे महत्त्व आहे. एक नाम मुखात सतत यायला, शत जन्म घ्यावे लागतात. संसारात राहून सर्व ऐश्वर्य भोगून हे नाम साध्य करता येते. त्यासाठी मायेची बेडी सोडावी लागते. अनंत जन्माचे पुण्य असेल तरच मुखी नाम येईल. या जन्मात प्राप्त झालेले नाम पुनर्जन्मात आपल्या बरोबर येते. अपयश हा दोष नाही. प्रयत्न महत्त्वाचे. भगवंत प्रत्यक्ष ब्रह्म आहे. त्यांनी आपल्याला हाताशी धरलेले आहे. ज्याला साधन मानवल, नराचा नारायण होतो. त्यासाठी ध्येय निश्चिती पाहिजे. बाबा म्हणतात नामाशिवाय जगणे व्यर्थ आहे.
म्हणून हे सर्व साध्य करण्यासाठी भक्तानी मन बुद्धी अहंकार सर्व सद्गुरुना अर्पण करावं, म्हणजे " याच वाटे पांडुरंग भेटे."
राजाधिराज सद्गुरू महाराज की जय।
----------------

No comments: