Sunday, November 10, 2019
Thursday, September 26, 2019
ऎसें कैसियानें भेटती ते साधू । ज्याचा अतर्क्य तर्कवेना बोध । ज्यांसी निजानंदी आनंदु । ज्याचा परमानंदी उद्वोधु ॥२॥
पवना घालवेल पालाण । पायीं चढवेल गगन । भुत भविष्य कळो येईल वर्तमान । परी त्या साधूचें न कळे महिमान ॥३॥
चंद्रामृत सुखें सेववेल । रवि अस्ता जाता धरवेल । बाह्या हेळा सागर तरवेल । परी त्या साधूची भेटी न होईल ॥४॥
।। श्री सद्गुरू समर्थ ।।
क्षेत्र निंबाळ, श्रावण साधना सप्ताह 2019 दि.29-08-2019,डॉ. अनिल कुमार कुलकर्णी मुंबई, आजच्या प्रवचन' संतांचे संगती मनोमार्ग गति। आकळावा श्रीपती येणे पंथे । या संत वचनाचा धागा धरुन संत संगति हे किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट करताना म्हणतात ईश्वराचे गुण दर्शन संतामध्ये दिसतात. 'तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण। तरीच महिमान येईल कळो। या उक्तीप्रमाणे पु. गुरुदेवांनी महाराजांच्या संगतीत राहून सूक्ष्म निरीक्षण केले, आणि महाराजांच्या अंगीभूत गुणाचे वर्णन करताना म्हणतात, महाराजांमध्ये निस्पृहता, दयाळूपणा, दृढतर मनोनिग्रह, आबालवृद्धांशी समता, शिष्यावर अलोट प्रेम, सद्गुरू वर निस्सीम भक्ती, अलौकीक शांति, उपाधिपासून अलिप्तता वगैरे गुण होते. अज्ञानाधंकाराचा नाश करण्याचे दिव्यकार्य हाती घेतले.ईश्वराचे सर्व गुण त्यानी महाराजात पहिले.हे महाराजानी निर्गुण भक्तिने प्राप्त
केलेले सगुणरुप.
मलाही नामाच्या द्वारे सद्गुरू कृपेने, शरणागतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल, अशी श्रध्देची पातळी पुर्ण झाली पाहिजे.
दत्त जयंतीच्या सप्ताहात निम्बर्गी महाराजांपुढे भक्तीची रुजवात होते. सद्गुरु बद्दल दृढ श्रद्धा होण्याइतपत भक्तिची वाटचाल विनाखंड/ शरणागत भावनाने झाली पाहिजे. तेव्हा जाणता भक्त सद्गुरूभक्तीत धन्य होतो. सहवासानी प्रेम येतं.
सद्गुरु सानिध्यात वारंवार गेलं पाहिजे.
उपराष्ट्रपती राधाकृष्ण यांनी गुरुदेवाना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत जाव ते तुम्हाला मानाने बोलवितात. पण गुरुदेवाची तयारी नव्हती. तेव्हां निदान माझ्या नावाची शिफारस करा म्हणून गुरुदेवांना विनविले. महाराजांच्या अनुमतिने श्री राधाकृष्णन त्यांच्या नावाची शिफारस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला केली. थोडक्यात पु. गुरुदेवांना मानाच्या पदाची अभिलाषा नव्हती.निंबाळला महाराजावरील दृढ श्रद्धेनी' रामप्रेमपुरनगर' निर्माण केले. या भक्तीनगरीत साधकानी वारंवार याव असे गुरुदेवांना वाटायच. सद्गुरूच चिंतन वारंवार झालं पाहिजे. म्हणजे श्रद्धा दृढतर होण्यास मदत होईल. जो भक्त भक्तीचं सतत गुणगान करतो, त्याची वाट भगवंत पाहत असतो. भक्तांच्या
अंतःकरणात ईश्वर वास नाम रूपाने करतो. श्रेष्ठ भक्ती सद्गुरू चरीत्राने अंतःकरणात ठसल्याने दृढ होते.साधकातून सिध्द कसे झाले
त्याप्रमाणे जीवन समृद्ध होणार आहे याच वारंवार निरिक्षण केलं पाहिजे.
श्री.काकासाहेब तुळपुळे, 1926 साल,नेम होईना म्हणून कल्पनेने अस्वस्थ होतात.कल्पना येणे वाईट नाही पण कृति वाईट. दुराचार वाईट. अंतरमनात कल्पना येतात पण त्याचा पिच्छा करु नये.मग तो हळूहळू विरु
लागतात. सद्गुणाचा विकास होत होत मनात सद्गुरू विषयी भाव निर्मिती होते. नैसर्गिक प्रवाह विषयाकडून देवाकडे नेतो.
दूरदर्शन हे आत्मदर्शनाकडे
वळते. तेव्हा मनाचे उन्मन होते.संकल्पाला उर्ध्वगती मिळते आणि ते ईश्वरवाटेवर नेते.विकल्प
अधोगतीला नेते आणि विषयात रमते.कठोपनिषदात.रथाची उपमा आहे.बुध्दि सारथी घोडे.मनच बंधमोक्षास कारणीभूत होते. म्हणूनच
"संतांचे संगती मनोमार्ग गति' ने "विषय तो झाला नारायण"भक्ताचा पुर्ण विकास होतो. मूळ उगमाकडे जाण ही भक्ति मनुष्याच्या अंतरंगात बदल घडवत. देहबुद्धी चे परिवर्तन आत्मबुध्दित होते.दृष्याच आकर्षक कमी होत ते आत्मदृष्याकडे वळते.
देवाच्या विचारात मन एकवटत.
मनावरच पटल क्षीण होत पुर्णत्वाच्या
स्वरुपाकड जात.दृष्टी उर्ध्व होत. नराचा नारायण स्वरुपाकडे धांव सुरु होते.God push to devotee .Devotee shd.push towards God. स्वये येतो नारायण तळमळत्या भक्त भेटीला. हेच पुर्णत्व.
हेच परमानंद.
।। राजाधिराज सद्गुरूनाथ महाराज की जय ।।
श्रीगुरुदेव रानडे
नामसाधनेचे स्वरुप
श्रीगुरुदेवांच्या एका आरतीत निंबाळ आश्रम म्हणजे नामाची नेमाची ही साधन पेठ असे म्हटले गेले आहे. नामस्मरणाने ईश्वरदर्शन घडून येऊ शकते, हा नाम विचार सांगताना श्रीगुरुदेवांनी साधनाचे चार प्रकार एका बैठकीत सांगितले आहेत.
१) नामजप माळेवर करणे. ही साधनेची सुरवात होय.
२) स्मरण म्हणजे सदैव आणि सर्वत्र नामाचे अनुसंधान ठेवणे होय.
३) नेम म्हणजे आसन सिध्द होऊन ठराविक वेळी आणि नित्याने नाम घेणे.
४) ध्यान म्हणजे नामस्मरण करीत असताना देवाचे अनुभव घेऊन त्याचेशी आनंदाने एकरुप होणे होय.
नाम जप हा श्वासोच्छ्वासात करावा. नामस्मरणाची सवय होई पर्यंत माळेवर जप करावा. पुढे माळ न घेता नामस्मरण हे सदैव आणि सर्वत्र करावे. गुरुकृपांकित नामाला सबीज नाम असे म्हटले जाते. त्यांत सद्गुरुंची कृपादृष्टी असल्याने अनुभव/प्रचिती लवकर येते. बिंदू, नाद, तेज, रंग, आकार इ. अनुभव हे निर्गुण देवाचे असल्याने अशा दर्शनाला वस्तू असे म्हटले गेले आहे. नामस्मरण किती आणि कसे करावे याविषयी दासबोधांत म्हटल्या प्रमाणे
नित्यनेमप्रातःकाळी
माध्यान्हकाळी सायंकाळी
नामस्मरण सर्वकाळी
करीत जावे !!
असा बोध निंबरगी संप्रदायाने प्रधान मानला आहे. गुरुसेवा करणे म्हणजे गुरुंनी दिलेल्या नामाचे स्मरण करणे होय.
प.पू.गोंदवलेकर महाराज यांनीही नामस्मरणास महत्व दिले असून त्यांचे भाष्यकार प्रा. के. वि. बेलसरे हे प्रत्येक प्रवचनातून गुरुदेवांच्या नामविचारांचा व निंबाळ येथील नामसाधनेचा उल्लेख करीत असत.
॥ श्रीसद्गुरु समर्थ ॥
।श्रीगुरुदेवांच्या आठवणी
प.पू.श्रीशिवलिंगव्वा अक्कांचे पत्र.
कै.म.न देशपांडे यांनी त्यांच्या आठवणीत श्रीगुरुदेवांनी बोलावलेल्या शेवटच्या सिटिंगचा भावपूर्वक उल्लेख केला आहे. त्या सिटिंगमध्ये श्रीगुरुदेवांनी प.पू.श्रीशिवलिंगव्वा अक्कांचे व श्रीसमर्थ भाऊसाहेब महाराजांचे अशी दोन पत्रे वाचून घेतली.
आजच्या आठवणीत आपण प.पू.शिवलिंगव्वा अक्कांचे ते पत्र पाहूया.
पत्र क्र १०२
श्रीगुरुसमर्थ
श्रीमंत सकलानंद सत्यस्वरुप आनंदभरित बुध्दिवान पुरुष आत्माराम अच्युत-गहन रामराव अण्णा दत्तात्रेय रानडे यांस जतेहून सिवक्का यांचा दोन्ही कर जोडून, समर्थचरणी मस्तक ठेवून त्रिकाळी अति
नम्रतेचा शिर साष्टांग दीर्घ दंडवत नमस्कार अशीर्वाद.
श्रीसमर्थकृपेकडून इकडील सर्व क्षेम असो.
समर्थांचा (१) चैत्र उत्सव आनंद आनंद थाट थाटाने जहाला. त्या समर्थांचा महिमा या चर्मतोंडाने सांगता येत नाही.
थोर भाग्याचे आम्ही तरी आहे
श्रीगुरु केला हो जाण बाप-माये ।
या वाक्याप्रमाणे माझे माय-बाप श्रीगुरुसमर्थच (२) झाल्याने मी किती ऐश्वर्यात होते हे माझे मलाच माहीत. त्या समर्थाचे व उपकाराचे वर्णन या चर्मतोंडाने किती केले तरी काय होणार आहे ?
आता या वचनाचा आविर्भाव असा आहे की बैरंग (बहिर्रंग) कामा नये. अंतरंग काही केल्या सोडू नये, असे समर्थांचे वाक्य असून मूळपर्यंत शोधूनही त्याकडे वरवरचे (वरवरची) भक्ती करेल तो एक मूर्ख. तर मूळ समर्थांकडे लक्ष देऊन भक्ती चालवेल तोच एक श्रेष्ठ गुरु. त्यांच्या आज्ञेवाचून काही केल्या हलणार नाही. अमचे कर्तृत्व……. श्रीगुरुसमर्थ.
(१) श्रीनिंबरगी महाराजांची पुण्यतिथी चैत्र शुध्द १३ ला असते.म्हणून हा उल्लेख श्रीसद्गुरु समर्थ निंबरगी महाराजांचा आहे.
(२) या ठिकाणी समर्थ म्हणजे प.पू.शिवलिंगव्वाचे सद्गुरु श्रीभाऊसाहेब महाराज
हे होत.
प.पू.शिवलिंगव्वा अक्कांचे वरील पत्र वाचल्यावर दोन गोष्टी ठळकपणे जाणवतात .
१ ) त्यांची श्रीभाऊसाहेब महाराजांविषयी असलेली अनन्यसाधारण भक्ती. व
२) त्यांना जाणवलेली श्रीगुरुदेवांची पारमार्थिक योग्यता व श्रीगुरुदेवांसंबंधी असलेली आत्मियता .
आणि मग सहजच आपल्या मनात श्री.म.न.देशपांडे यांना सुचलेला “ अशा आत्यंतिक भक्तीला आपण केव्हातरी पोहचूं का ?” असा विचार आल्याशिवाय रहात नाही.
क्रमशः ………….
संदर्भ: पृ.क्र.१७६, “ श्रीगुरुदेव रा.द.रानडे यांची जावक पत्रे “ संग्राहक व प्रकाशक - दीपक आपटे
संपादन : डाॅ. अश्विनी अविनाश जोग.
संकलन :दिलीप र.नाईक.
॥ राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय ॥
०००००००©©©०००००००
जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥
या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक ।
ऐसा वेणूनादीं कान्हा दावा ॥४॥
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ।
ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥
सेना म्हणे खूण सांगितली संती ।
या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥
आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥
या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक ।
ऐसा वेणूनादीं कान्हा दावा ॥४॥
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ।
ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥
सेना म्हणे खूण सांगितली संती ।
या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥
Subscribe to:
Posts (Atom)




