Thursday, September 26, 2019

।। श्री सद्गुरू समर्थ ।।
क्षेत्र निंबाळ, श्रावण साधना सप्ताह 2019 दि.29-08-2019,डॉ. अनिल कुमार कुलकर्णी मुंबई, आजच्या प्रवचन' संतांचे संगती मनोमार्ग गति। आकळावा श्रीपती येणे पंथे । या संत वचनाचा धागा धरुन संत संगति हे किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट करताना म्हणतात ईश्वराचे गुण दर्शन संतामध्ये दिसतात. 'तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण। तरीच महिमान येईल कळो। या उक्तीप्रमाणे पु. गुरुदेवांनी महाराजांच्या संगतीत राहून सूक्ष्म निरीक्षण केले, आणि महाराजांच्या अंगीभूत गुणाचे वर्णन करताना म्हणतात, महाराजांमध्ये निस्पृहता, दयाळूपणा, दृढतर मनोनिग्रह, आबालवृद्धांशी समता, शिष्यावर अलोट प्रेम, सद्गुरू वर निस्सीम भक्ती, अलौकीक शांति, उपाधिपासून अलिप्तता वगैरे गुण होते. अज्ञानाधंकाराचा नाश करण्याचे दिव्यकार्य हाती घेतले.ईश्वराचे सर्व गुण त्यानी महाराजात पहिले.हे महाराजानी निर्गुण भक्तिने प्राप्त
केलेले सगुणरुप.
मलाही नामाच्या द्वारे सद्गुरू कृपेने, शरणागतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल, अशी श्रध्देची पातळी पुर्ण झाली पाहिजे.
दत्त जयंतीच्या सप्ताहात निम्बर्गी महाराजांपुढे भक्तीची रुजवात होते. सद्गुरु बद्दल दृढ श्रद्धा होण्याइतपत भक्तिची वाटचाल विनाखंड/ शरणागत भावनाने झाली पाहिजे. तेव्हा जाणता भक्त सद्गुरूभक्तीत धन्य होतो. सहवासानी प्रेम येतं.
सद्गुरु सानिध्यात वारंवार गेलं पाहिजे.
उपराष्ट्रपती राधाकृष्ण यांनी गुरुदेवाना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत जाव ते तुम्हाला मानाने बोलवितात. पण गुरुदेवाची तयारी नव्हती. तेव्हां निदान माझ्या नावाची शिफारस करा म्हणून गुरुदेवांना विनविले. महाराजांच्या अनुमतिने श्री राधाकृष्णन त्यांच्या नावाची शिफारस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला केली. थोडक्यात पु. गुरुदेवांना मानाच्या पदाची अभिलाषा नव्हती.निंबाळला महाराजावरील दृढ श्रद्धेनी' रामप्रेमपुरनगर' निर्माण केले. या भक्तीनगरीत साधकानी वारंवार याव असे गुरुदेवांना वाटायच. सद्गुरूच चिंतन वारंवार झालं पाहिजे. म्हणजे श्रद्धा दृढतर होण्यास मदत होईल. जो भक्त भक्तीचं सतत गुणगान करतो, त्याची वाट भगवंत पाहत असतो. भक्तांच्या
अंतःकरणात ईश्वर वास नाम रूपाने करतो. श्रेष्ठ भक्ती सद्गुरू चरीत्राने अंतःकरणात ठसल्याने दृढ होते.साधकातून सिध्द कसे झाले
त्याप्रमाणे जीवन समृद्ध होणार आहे याच वारंवार निरिक्षण केलं पाहिजे.
श्री.काकासाहेब तुळपुळे, 1926 साल,नेम होईना म्हणून कल्पनेने अस्वस्थ होतात.कल्पना येणे वाईट नाही पण कृति वाईट. दुराचार वाईट. अंतरमनात कल्पना येतात पण त्याचा पिच्छा करु नये.मग तो हळूहळू विरु
लागतात. सद्गुणाचा विकास होत होत मनात सद्गुरू विषयी भाव निर्मिती होते. नैसर्गिक प्रवाह विषयाकडून देवाकडे नेतो.
दूरदर्शन हे आत्मदर्शनाकडे
वळते. तेव्हा मनाचे उन्मन होते.संकल्पाला उर्ध्वगती मिळते आणि ते ईश्वरवाटेवर नेते.विकल्प
अधोगतीला नेते आणि विषयात रमते.कठोपनिषदात.रथाची उपमा आहे.बुध्दि सारथी घोडे.मनच बंधमोक्षास कारणीभूत होते. म्हणूनच
"संतांचे संगती मनोमार्ग गति' ने "विषय तो झाला नारायण"भक्ताचा पुर्ण विकास होतो. मूळ उगमाकडे जाण ही भक्ति मनुष्याच्या अंतरंगात बदल घडवत. देहबुद्धी चे परिवर्तन आत्मबुध्दित होते.दृष्याच आकर्षक कमी होत ते आत्मदृष्याकडे वळते.
देवाच्या विचारात मन एकवटत.
मनावरच पटल क्षीण होत पुर्णत्वाच्या
स्वरुपाकड जात.दृष्टी उर्ध्व होत. नराचा नारायण स्वरुपाकडे धांव सुरु होते.God push to devotee .Devotee shd.push towards God. स्वये येतो नारायण तळमळत्या भक्त भेटीला. हेच पुर्णत्व.
हेच परमानंद.
।। राजाधिराज सद्गुरूनाथ महाराज की जय ।।

No comments: