Sunday, July 17, 2016

श्री श्री सुज्ञानेन्द्रतीर्थ स्वामींनी रचलेले रामायणावरील प्रभात पंचक.
१८३६ ते १८६१ हा त्यांचा कालखंड होता. ते राघवेंद्र स्वामी मठाच्या पीठावरील होते. ते खूप ज्ञानी होते. त्यांनी संपूर्ण रामायण कथा पाच श्लोकांमध्ये बांधली. श्री राघवेंद्र स्वामींनी "श्री राम चरित्र मंजिरी" मध्ये संपूर्ण रामायण कथा ११ श्लोकांमध्ये बसविली होती. सुज्ञानेन्द्रतीर्थांनी थोडे पुढे जाऊन रामायण कथा ५ श्लोकांमध्ये बसविली. त्यामुळे रोज पूर्ण रामायण म्हणता येते.
प्रात: स्मरामि रघुराममनेकरक्षो भीतस्वभक्तजनता परिपालनाय ।
जातं स्वतो दशरथादिति कैतवेन नीति प्रकाशित महामुनि शिष्याभावं ॥१॥
अर्थ : राक्षसांपासून भयभित झालेल्या भक्ताना तारण्यासाठी श्री रामाने स्वत: या जगात राजा दशरथाचा मुलगा म्हणून अवतार घेतला. विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाला त्यांच्याबरोबर यज्ञ रक्षणासाठी घेतेले. श्री रामांनी विश्वामित्रांचे शिष्यत्त्व स्वीकारले आणि त्यांच्याकडून पवित्र वेद ऋचा शिकून घेतल्या. अश्या श्री रामाचे सकाळी स्मरण करूया.
प्रातर्भजामि गुरुसत्रविरोधीरक्षो जातं निहत्य कलयन विमालामहल्यां ।
यातां सतीसारणिमीशधनुश्च भंक्त्वा सीतामवाप्य पथि दर्शित भार्गवैक्यं ॥२॥
अर्थ : ऋषींच्या यज्ञामध्ये व्यत्यय आणणार्या राक्षसांचा श्री रामाने संहार केला. त्यानंतर श्री रामांनी रामांची वाट बघत असलेल्या शापित अहिल्येचा उद्धार केला. अर्थ : ऋषींच्या यज्ञामध्ये व्यत्यय आणणार्या राक्षसांचा श्री रामाने संहार केला. त्यानंतर श्री रामांनी रामांची वाट बघत असलेल्या शापित अहिल्येचा उद्धार केला. यानंतर प्रभू रामांनी राजा जनकाच्या महालात शिवधनुष्य उचलून ते तोडून सीतेचे स्वयंवर जिंकले. मग श्रीराम अयोध्येस परत जात असताना भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेले परशुराम रामांमध्ये विलीन झाले.
प्रातर्नमामि पुरमाप्य पितुर्निदेशात भ्रातु:प्रदाय निजराज्यमरण्यमेत्य ।
सीतां स्थितामपह्नतेति चरन तदाप्तै वातात्मजोक्तिसचिवीकृतसुर्यसूनुं ॥ ३ ॥
अर्थ : अयोध्येस परत आल्यावर आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार रामांनी आपल्या धाकट्या भावाला भरताला राज्य दिले आणि वनवासात निघून गेले. (सीता व लक्ष्मणा सहित). सीतेचे अपहरण झाल्यावर तिच्या शोधार्थ श्री राम जात असताना त्यांची वायुपुत्र हनुमंतांशी भेट होते, जे सूर्यपुत्र सुग्रीवाकडे मंत्री होते. हनुमंतांच्या सांगण्यावरून श्री राम सुग्रीवाचा भाऊ वाली याकडील राज्य सुग्रीवाला परत मिळवून देतात. अश्या रामचंद्रांना मी प्रातःकाळी नमस्कार करतो.
टीप : श्री राघवेंद्र स्वामींच्या "राम चरित्र मंजिरी" मधल्या सहाव्या श्लोकामध्ये देखील सुग्रीवाचा सुर्यपुत्र असा उल्लेख आपल्याला आढळून येतो.
प्रातर्निरंतरमहं मनसार्चयामि सीतास्थितिम दशमुखस्य वने विदित्वा ।
ज्ञात्वा च लौकिकवदाप्तमरुत्सुतेन सेतुं निबध्य जलधौ हतरावणादिम ॥ ४ ॥
अर्थ : हनुमंतांना सीतेच्या शोधात यश येते आणि ते श्री रामांचे क्षेमकुशल सीता माईना सांगतात. आणि रामचंद्रांकडे परत आल्यावर सीता माईबद्दल सांगतात. लंकेस जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधण्यास तसेच रावणाविरुद्ध युद्ध करून त्यात विजय मिळवण्यात हनुमंत श्री रामांची मदत करतात. प्रातः काळी श्री रामांची मी नित्य आराधना करतो.
प्रातः स्तवीमि दशकंधरराज्यमस्य भ्रातुः प्रदाय दहने विनिपात्य यातां ।
सीतां प्रग्रह्य भरतार्पितसर्वराज्य पातारमात्म शरणामरधेनु रत्नम ॥ ५ ॥
अर्थ : श्री रामांनी रावणाविरुद्धचे युद्ध जिंकून लंकेचे राज्य विभिषणाला दिले. विभिषणाने आपल्या भावाचे रावणाचे अग्निसंस्कार केले. सीतामाई बरोबर राम अयोध्येस परत आले आणि भरताकडून राज्यपद स्वीकारतात. पवित्र गाई (अमर धेनु) प्रमाणे असलेल्या भगवंताला मी शरण जातो. आणि अश्या प्रभू रामचंद्रांची मी प्रातः काळी प्रार्थना करतो.
टीप : रावणाला दशानन वगैरेनेच संबोधले जाते. पण इथे त्याचा उल्लेख दशकंधर असा केला आहे. म्हणजे दहा माना असलेला. तसेच रामांना अमर धेनु हे विशेषण वापरले आहे. याचे कारण असे की हनुमंतांनी रामायणाच्या शेवटी रामचंद्रांच्या ज्या स्वरूपाचे ध्यान केले ते हे अमर धेनु स्वरूप होते.
फल:स्तुति
श्री मध्वसुजनेन्द्रै तन्मध्यस्थगुरुह्र्द्गतः रामः प्रीतोस्तु वाग्रत्नैः कर्मन्दिविभवोचितैः ।
सुजनेन्द्रकराब्जोत सुज्ञानेन्द्रयतीरितं प्रभातपंचकं नित्यं पठन रामप्रियो भवेत ॥ ६ ॥
अर्थ : या प्रार्थनेमुळे श्री मध्वाचार्यांच्या तसेच श्री सुजनेन्द्रतीर्थांच्या हृदयी निवास करणारे श्री रामचंद्र कृपा करोत. श्री सुजनेन्द्रतीर्थांचे शिष्य श्री सुज्ञानेन्द्रतीर्थांनी केलेल्या या प्रभात पंचकाचे जो नित्य पठण करेल त्याच्यावर रामचंद्रांची पूर्ण कृपा राहील.

No comments: